Friday, 20 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ

श्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ हा 30 जून 2022 ते 26 नोव्हेंबर 2024 म्हणजे साधारण 2 वर्षे 4 महिने 27 दिवस त्यांचा कार्यकाळ हा मुख्यमंत्री म्हणून राहिला.

त्यांनी या कार्यकाळात खूप चांगल्याप्रकारे कामे केली, त्यांनी शेतकऱ्यांसाठी, बेरोजगार तरुणांसाठी, महिलांसाठी खूप सारे चांगले निर्णय घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे निर्णय घेतले.

त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्ष नेत्यांकडून कोंडी करण्यात आली पण त्यांच्या अनुभवाने त्यांनी ती मोडीत काढली. शेतकर्यांच्या पिकांना हमीभावासाठीही विरोधकांनी विरोध केला.

शेतकरी वर्गात पण त्याची नाराजी होती. पण त्यांच्या शेवटच्या बजेटमध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी जणू तिजोरीत उघडून दिली. त्यांच्या कामाबद्दल विरोधी नेतेही त्यांची प्रशंसा करायचे. त्यांनी आज त्यांचा पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकार करून त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री बनवले आहे.

महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण बनेल?

20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतदाना नंतर सर्वांच्या नजरा या 23 नोव्हेंबर 2024 तारखेच्या निकालावर होत्या. विधानसभा निवडणुकीत महायुती गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले. 288 पैकी 237 उमेदवार निवडून आल्यामुळे महायुती गटाला हे बहुमत प्राप्त झाले. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकारचा मुख्यमंत्री बनेल.

पण यात तीन पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र आहेत. मग यात ज्या पक्षाचे जास्त उमेदवार निवडून आले असतील, त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनेल. पण या विषयी चर्चा चालू आहे. तिघी पक्षांना वाटते, आमचा नेता हा मुख्यमंत्री बनवा. त्यात संभाव्य उमेदवार कोण आहेत, पाहू या.

देवेंद्र फडणवीस :- यांनी शांतता आणि संयम ठेवता मागील 5 वर्षांपासून विधानसभेत जास्त आमदार असूनसुद्धा ते उपमुख्यमंत्री राहिले. 2014 ते 2019 हा त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ खूप चांगला मानला जातो. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप चांगले निर्णय घेतले आहेत. म्हणून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार त्यांना मानले जात आहे.

शिंदे गटातील एकनाथ शिंदे :- मागील 2 वर्ष 4 महिन्यांपासून मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. आणि काळ त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा हा राजभवनात जाऊन राज्यपाल यांच्या कडे सुपूर्त केला. त्यांनी ही खूप चांगली कामे केली आहेत. त्यामुळे हे पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत.

नवीन सरकारकडून जनतेच्या अपेक्षा

विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुती सरकारवर विश्वास दाखवत त्यांना बहुमताने विजयी केले आहे. तर या विजयासोबतच सरकारवर मोठी जबाबदारी आहे आणि जनतेला या नवीन सरकारकडून बऱ्याच काही अपेक्षा आहेत. चला तर पाहू या.

1. शेतकऱ्यांचे प्रश्न :- महाराष्ट्रात नवीन सरकार लवकरच बनेल. शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने खूप सारे घोषणा केल्या होत्या. त्या आता पूर्ण कराव्यात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्यात म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, सोयाबीन पिकाला 6000 रुपये हमीभाव, शेतकऱ्यांचे कर्ज माफी, संपूर्ण वीजबिल माफ, नमो शेतकरी सम्मान निधी योजनेत सांगितल्याप्रमाणे 3000 रुपये म्हणजे एकूण त्यात राज्य सरकारच्या आधीचे 6000 रुपये आणि हे 3000 रुपये असेच एकूण 9000 रुपये हे सर्व प्रश्न सरकारने सोडवावेत हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे नवीन सरकारकडून.

2. तरुणांचे प्रश्न :- महाराष्ट्रात बेरोजगार तरुणांचा खूप मोठा वर्ग आहे. तर स्थानिक पातळीवर सरकारने रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रखडलेली सरकारी भरती पूर्ण करणे ह्या तरुणांच्या समस्या आहेत.

3. पायाभूत सुविधा :- आरोग्य सुविधा, पाणी सुविधा, शहरी रस्ते, ग्रामीण भागातील रस्ते, महागाईवर नियंत्रण, नदीजोड प्रकल्प अशा मूलभूत गरजा सरकारने पूर्ण कराव्यात.

4. महिलांचे प्रश्न :- महिलांचा सुरक्षेचा प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय बनतो. पण त्यासाठी ठोस पाऊले उचलली जात नाहीत. येणारे नवीन सरकार या प्रश्नांना सोडेल अशी अपेक्षा करतो. सरकारने सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये लवकरात लवकर देणे.

महिलांसाठी लवकर पोलीस भरती काढणे. अशा अजून बऱ्याच समस्यांविषयी सरकारने लवकरात लवकर ठोस पाऊल उचलायला हवे.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet