ई-श्रम कार्ड (E Shram Card) तपशील
योजनेचे नाव | ई-श्रम कार्ड योजना (E-Shram Card Yojana) |
विभाग | कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत सरकार (Government of India Ministry of Labour & Employment) |
तारीख | 26 ऑगस्ट 2021 |
लाभार्थी | भारतातील असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार |
योजनेचा लाभ | ई-श्रम योजनेत नोंदणी झालेल्या कामगाराचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास सुरक्षा आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे |
वयाची मर्यादा | 16-59 वर्षे |
अधिकृत वेबसाइट | https://eshram.gov.in/ |
हेल्पलाइन क्रमांक | 14434 |
पेन्शन लाभ | 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ₹3,000 प्रति महिना पेन्शन |
ई-श्रम कार्ड (E Shram Card) विषयी
भारतात खूप मोठ्या प्रमाणात लोक मजुरी करतात. मग प्रश्न येतो, अशा गरीब जनतेपर्यंत सरकारी योजना कशी पोहचवावी? त्यासाठी भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या गरीब लोकांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे, त्याला सरकारने ई-श्रम कार्ड (E Shram Card) असे नाव दिले आहे. भारतातील कामगारांना एकत्रित करून त्यांना स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सरकारने ही योजना भारतातील गरीब मजूर वर्गासाठी, पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोट्या नोकऱ्या करणारे, खेडेगावात शेतमजूर करणारे आणि शहरांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांसाठी सुरू केली आहे.
ई-श्रम कार्डचा उद्देश काय आहे | Purpose of e-Labor Card
भारतातील सर्व प्रकारच्या असंघटित कामगारांना (NDUW) कल्याणकारी लाभ, सरकारी योजनेचा लाभ, रेशन लाभ, मजूर लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक सुरक्षा सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या रोजगार मंत्रालयाद्वारे गरीब मजुरांसाठी चालवली जाणारी ई-श्रम कार्ड योजना आहे.
या योजनेचा उद्देश भारतात काम करणारे सर्व असंघटित कामगारांची नोंदणी एक प्लॅटफॉर्मवर करणे आणि त्यांना एक ओळखपत्र प्रदान करणे हा आहे, जेणेकरून कामगारांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा जास्तीत जास्त आणि योग्य लाभार्थीला लाभ घेता येईल.
देशात सध्या 42 कोटी पेक्षा जास्त असंघटित कामगार आहेत. यात मुख्यतः शेतात काम करणारे कामगार, दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करणारे कामगार, विडी कामगार, अनेक प्रकारचे बांधकाम कामगार, शहरातील किंवा गावातील रस्त्यावरील विक्रेते, हातमाग मोलमजुरी, मध्यान्ह भोजन कामगार, चामडे कामगार, वीटभट्टी कामगार, दृकश्राव्य कामगार, मोची काम करणारे, चिंध्या वेचणारे मजूर, घरगुती कामगार, धोबी काम करणारे, रिक्षा चालवणारे, भूमिहीन मजूर किंवा इतर व्यवसायातील कामगार कोणताही कामगार सरकारी योजनांपासून वंचित राहू नये, हा त्याचा उद्देश आहे.
कोणाला 3,000 रुपये मिळणार आणि कधी मिळणार
ग्रामीण आणि शहरी भागात सध्या एकच विषय आहे. लाडकी बहीण योजनेसारखं. केंद्र सरकार आता 3,000 रुपये आपल्या बँक खात्यात DBT मार्फत जमा करणार आहे. त्या साठी लोकांनी ई-श्रम कार्ड रेजिस्ट्रेशन आणि अद्ययावत करायला सुरवात केली आहे. पण सत्य काही वेगळेच आहे. चला तर पाहू या 3,000 रुपये कोणाला आणि कधी भेटणार आहेत.
भारत सरकारच्या रोजगार मंत्रालयाद्वारे ई-श्रम कार्डच्या माध्यमातून गरीब आणि मजूर लोकांसाठी एक योजना आणली आहे. या योजनेमार्फत गरीब आणि मजूर लोकांना महिन्याला 3,000 रुपये इतकी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून सरकार देणार आहे. पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या काही अटी आणि शर्ती आहेत.
सरकारने या योजनेला “प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना” म्हणजे (PM-SYM) असे नाव दिले आहे. ही ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे. असंघटित कामगारांच्या (UW) वृद्धत्व आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली भारत सरकारची गरीब आणि मजूर लोकांसाठीची योजना आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 60 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपये किमान पेन्शन दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, लाभार्थ्यांच्या जोडीदारास 50% मिळणार. ही पेन्शन फक्त जोडीदारालाच लागू असेल. लाभार्थी या योजनेमधून मिळणाऱ्या मासिक 3,000 रुपये पेन्शन त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतो.
ही योजना भारत सरकारतर्फे भारतातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना भेट दिली आहे. कारण देशाच्या अंतर्गत उत्पादनात (GDP) 50 टक्के योगदान कामगार आणि मजूर देतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत 55 ते 200 रुपये प्रतिमहिना मासिक भरावा लागेल. त्यानंतर वयाच्या 60 वर्षे पूर्ण झाल्यावर कामगार लाभार्थी त्याच्या पेन्शनच्या रकमेचा दावा सरकारकडे करू शकतो.
तुम्ही या योजनेत 55 ते 200 रुपये पर्यंत मासिक भरणा करणार, तेव्हा सरकार सुद्धा तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला तेवढीच रक्कम तुमच्या पेन्शन खात्यात जमा करेल.
ई-श्रम योजनेसाठीची पात्रता | Eligibility for E-Labor Scheme
- लाभार्थी हा असंघटित कामगार (UW) असावा.
- लाभार्थीचे वय हे 18 ते 40 वर्षे असावे.
- लाभार्थीचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
ई-श्रम योजनेसाठी लागणारे कागदपत्रे | Required Documents for E-Labour Scheme
आधार कार्ड: आधार कार्ड महत्वाचा पुरावा मानला जातो. त्यात विशेषतः तुमचे नाव, फोटो आणि निवासाचा पत्ता म्हणून आधार कार्ड पुराव्याचे काम करते. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक हा तुमच्या हाताचे बोट आणि डोळे हे बायोमेट्रिक सोबत जोडले गेले आहेत.
बँक खाते पासबुक: लाभार्थी कामगारांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे, आणि ते बँक खाते तुमच्या आधार लिंक असणे गरजेचे आहे. तुमचे बँक खाते आधार संलग्न नसेल तर तुम्हाला लाभ मिळण्यास त्रास होईल. म्हणून आधीच तुमचे बँक खाते आधार सोबत लिंक करून ठेवा.
छायाचित्र: अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे नवीन किंवा मागील 2-3 महिन्यांपूर्वीचा पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. फोटो स्पष्ट आणि साध्या पार्श्वभूमीचा असावा.
अतिरिक्त कागदपत्रे: तुम्हाला या व्यतिरिक्त तुमचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, कामाचा पुरावा, वीजबिल इत्यादी कागदपत्र लागू शकतात.
संपर्क माहिती (contact information)
हेल्पडेस्क क्रमांक (Helpdesk No) | 14434 / 1800889681 |
वेळ (Time) | सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 (9.00 AM to 6.00 PM) |
सर्व्हिस काळ | दररोज (रविवारसह) (Daily Including Sundays) |
निष्कर्ष (Conclusion)
भारत सरकारच्या ई-श्रम कार्ड योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि मोलमजूर करणाऱ्या लोकांना आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे. “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना” अंतर्गत देशातील 60 वर्षांवरील वयाच्या गरीब कामगारांना आणि मजुरांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन देण्याचा उद्देश आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत, ते पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात कामगारांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी हवे. लाभार्थ्यांचे वय 18 ते 40 वर्षे असावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. त्या सोबत योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, तसेच मासिक शुल्क हे वेळोवेळी भरणे आवश्यक अट आहे.
या योजनेमुळे भारतातील मजूर आणि कामगारांना त्यांच्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी मदत मिळेल. 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3,000 रुपये पेन्शन म्हणून लाभार्थ्याला दिली जाईल. जेणेकरून त्याचा आणि त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालेल.
FAQs : योजनेविषयी विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न 1. ई-श्रम कार्डमध्ये 1000 रुपये जमा झाली की नाही कसे तपासायचे?
उत्तर: e-Shram वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा, नंतर 'व्यवहार' टॅबवर क्लिक करा आणि आपली रक्कम जमा झाली की नाही तपासा.
प्रश्न 2. मोबाईलवरून ई-श्रम कार्डचे पैसे कसे चेक करायचे?
उत्तर: तुमच्या मोबाईलवरून 14434 डायल करून तुमच्या ई-श्रम कार्डची शिल्लक जाणून घ्या.
प्रश्न 3. ई-श्रम कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता का?
उत्तर: असंघटित क्षेत्रातील कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार ई-श्रम कार्डसाठी CSC किंवा पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
प्रश्न 4. ई-श्रम कार्ड म्हणजे काय?
उत्तर: असंघटित क्षेत्रातील कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा प्रदान आणि विविध कल्याणकारी योजना लाभ त्यांच्या पर्यंत पोहचावा म्हणून ई-श्रम कार्ड क्रांतिकारक उपक्रम सुरु केला आहे.
प्रश्न 5. ई-श्रम कार्डसाठी कोण पात्र आहे?
उत्तर: 16 ते 59 वर्षे वयोगटातील सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार या योजनेत रजिस्ट्रेशन करण्यास पात्र आहेत.
प्रश्न 6. EPFO/ESIC किंवा NPS चे सदस्य ई-श्रम योजनेत रजिस्ट्रेशन करू शकतात का?
उत्तर: नाही, EPFO/ESIC किंवा NPS चे सदस्य ई-श्रम योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. ते ह्या योजनेसाठी अपात्र आहेत.