पीएम सूर्यघर योजनेविषयी अपडेट। PM Suryaghar Yojana update
आपण पाहतोय देशातील शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या कल्याणासाठी सरकार नवनवीन उपक्रम आणि योजना राबवत असते. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये प्रधानमंत्री सूर्य घर योजना (PM Suryaghar Yojana) हे खूप महत्वाकांशी योजना मानली गेली.
या योजनेमधून शेतकऱ्यांना दिवस वीज मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे तर शहरी आणि ग्रामीण भागातील घरांवर सोलर बसवून घरमालकाची वीजबिल पासून सुटका होईल आणि अतिरिक्त वीज विकून त्यामधून एक प्रकारचे उत्पन्न सुद्धा मिळणार. म्हणून सरकारसाठी ही योजना महत्वाकांशी योजना आहे.
या योजनेचा आणखी दुसरा मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या जेणे करून देशात नैसर्गिक वीजनिर्मीतीवर भर दिला जाईल. या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या शेतात आणि घरावर सोलर पॅनल बसवावे यासाठी सरकार ४० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आणि जनतेचे वीजबिल कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय असल्याचं सिद्ध होत आहे. २०२४ पासून केंद्र सरकारने देशातील करोडो लोकांच्या घरावर सौर पॅनेल बसवण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे, त्यासोबत या योजनेत सामील झाल्यानंतर आणि घरावर सोलर बसवल्यानंतर अतिरिक्त लागणाऱ्या युनिटवर सरकार तुम्हाला दरमहा ३०० युनिट मोफत वीज देणार आहे.
सोलरच्या वापरामुळे घरातील विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत होईल आणि सौर पॅनेलने वीज निर्मिती केली असता ती पर्यावरण पूरक मानली जाईल, या मुळे पर्यावरणाला ही फायदा होईल, म्हणून त्याला स्वच्छ आणि हरित ऊर्जा स्रोत असेही संबोधले जाते. पण लाखो लोकांनी योजनेचा लाभ घेतला आहे.
त्यांनी आपल्या शेतात आणि घरावर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेअंतर्गत सोलर सुद्धा बसवले, पण अद्याप त्यांना अनुदान मिळाले नाही किंवा अनुदान मिळण्यास भरपूर अडचणी येत आहेत. त्यांना कुठून मदत मिळेल, त्यांनी कुठे आणि कशी तक्रार करावी या विषयी सविस्तर जाणून घेऊ.
शेतकऱ्यांची आणि जनतेची काय समस्या आहे?
देशातील लाखो लोकांनी पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत आपल्या शेतात आणि घरावर सौर पॅनेल बसवले. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली असून तरीही त्यांना या योजनेचे अनुदान मिळाले नाही. सबसिडीचे पैसे खात्यात जमा होत नाहीत, ही अडचण खूप साऱ्या लोकांना येत आहे.
काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, आम्ही सरकारी कार्यालयांचे, कृषी विभागाकडे जाऊन अर्जाविषयी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा अजून सबसिडीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आले नाहीत. त्यांनी बँकेत जाऊन बँकेची ई-केवायसी सुद्धा पूर्ण केली आहे.
शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अजून अनुदान मिळाले नसेल तर काय करावे?
ज्या शेतकरी बांधवांनी आणि लोकांनी पीएम सूर्यघर योजनेचा (PM Suryaghar Yojana) लाभ घेतला असेल आणि आपल्या घरावर किंवा शेतात सोलर पॅनेल लावले असतील, आणि अनुदानाची वाढ पाहत असतील, तर चिंता करू नका. आता तुम्ही तुमची तक्रार नोंवू शकता.
खाली दोन पर्याय दिले आहेत, ते वाचा आणि तुमच्या समस्यांचे निवारण करा आणि तुमचे अटकलेले अनुदान मिळवा.
तुमची तक्रार टोल-फ्री क्रमांकावर नोंदवा
मित्रांनो, तुम्ही तुमची तक्रार सरकारने जनतेसाठी तयार केलेल्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून नोंदवू शकता. त्यासोबत, तुम्हाला योजनेविषयी काही वेगळ्या समस्या असतील किंवा तुम्हाला मदत हवी असेल,
तरी तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता.
टोल फ्री क्रमांक - १८००-१८०-३३३३
सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून तक्रार नोंदवा
यावतिरिक्त, तुम्ही प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या (Pradhanmantri Suryaghar Yojana) अधिकृत वेबसाइट https://pmsgg.in/ वर जाऊन सुद्धा तुमची तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला तुमच्या समस्येविषयी संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
त्यासोबत समस्येविषयी कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना समजण्यास सोपे जाईल की तुम्हाला अडचण काय आहे आणि लवकरात लवकर तुमची तक्रार सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.