गांडूळखता विषयी संपूर्ण माहिती (Vermicompost)
गांडूळखत हे शेतीसाठी खूप उपयुक्त मानले जाते. हे खत जैविक आणि सेंद्रिय असते. मित्रांनो, आपण जमा केलेल्या कचऱ्यावर पाणी टाकत राहिलो तर कुंजतो. मग नंतर त्या कचऱ्यावर गांडूळ सोडले जातात.
गांडूळ या कचऱ्याला खाऊन तिथल्या मातीला सुपीक बनवण्याचे काम करते. असे केल्याने जैविक पदार्थ मातीत मिसळून मातीच्या पोषणतत्त्वांमध्ये सुधारणा करतात.
या मधून तयार होणारे खत तुम्ही तुमच्या शेतात किंवा बगीचेमध्ये वापरू शकता. जेणेकरून शेतातील पिकांना योग्य पोषणतत्त्व मिळतील. आणि बागेत हे खत वापरले तर आपला बगीचा हिरवागार आणि छान दिसेल.
गांडूळखत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कचरा
गांडूळ खत बनवण्यासाठी विविध प्रकारचा कचरा वापरू शकतो. त्या विषयी खाली आपण सविस्तर माहिती पाहू या.
कचऱ्याचा प्रकार | कचऱ्याबद्दल |
---|---|
सेंद्रिय कचरा (Organic Waste) | सेंद्रिय कचऱ्यात तुम्ही भाज्या, गवत, मुळे, झाडांच्या तुटलेल्या फांद्या, झाडाखाली पडलेले पाने, फळांचे छिलके इत्यादी प्रकारचा कचरा वापरू शकता. |
शेतातील कचरा (Farm Waste) | शेतातील कचरा म्हणजे त्यात तुम्ही धान्य साफ करून उरलेले अवशेष किंवा धान्य काढून उरलेले अवशेष, शेतातील गवत आणि तण किंवा तुमच्या शेतीतील फळभाज्यांचे अवशेष सुद्धा तुम्ही वापरू शकता. |
इतर कचरा (Other Waste) | इतर कचरा म्हणजे घरातील कागदाचे छिलके, चहा पावडर, कॉफीचे उरलेले पदार्थ, स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचे किंवा फळाचे अवशेष, छिलके, पाण्यात कुंजलेला कागद इत्यादी तुम्ही वापरू शकता. |
गांडूळखताचे फायदे
जमिनीची पोत सुधारते
एक सर्वे नुसार असे लक्षात आले आहे की रासायनिक खतांच्या जास्त वापराने जमिनीची पोत खराब होत चालली आहे. त्यासाठी गांडूळ खत खूप उपयोगी मानले जाते. गांडूळ खत जमिनीची पोत सुधारण्यास मदत करतो. वर्षानुवर्षे शेतकरी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतातील माती कठीण आणि खूप घट्ट बनत जाते.
ज्यामुळे जमिनीत हवा कमी प्रमाणात पोहोचते. असे झाल्याने जमिनीला लागणारे पोषणतत्त्वे हे योग्य प्रमाणात मिळत नाहीत. पण जर तुम्ही शेतात गांडूळ खताचा योग्य वापर केला तर शेतातील माती नरम आणि भूसभुशीत होऊन तिची गुणवत्ता वाढेल. भूसभुशीत जमिनीत हवेचा प्रवाह वाढल्याने मुळांना योग्य पोषण मिळते आणि त्यांची योग्य वाढ होते.
शेतातील माती भूसभुशीत झाल्याने पाणीचा निचरा हा योग्य रीतीने होऊ लागतो. याचा फायदा हा झाडांच्या पोषणावर दिसतो. गांडूळ खतामुळे जमिनीची पोत सुधारणे हा एक सोपा मार्ग आहे.
मातीच्या कणांच्या रचनेत बदल
शेतातील मातीतल्या कणांचे योग्य मिश्रण करणे गरजेचे आहे कारण लहान आणि मोठ्या कणांचे योग्य मिश्रण केल्याने माती चांगल्या प्रमाणात भुसभुशीत आणि गुळगुळीत बनते. गांडूळ हे मातीत फिरत असताना मातीतल्या कणांचा आकार बदलवत असतात, त्यामुळे जमिनीत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचतो.
त्यामुळे मातीची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते. मातीच्या मिश्रणामुळे निचरा (drainage) योग्य होतो आणि धूप (erosion) कमी होतो. मातीमधील गुणवत्ता आणि टिकाव वाढून राहतो, आणि मिश्रणामुळे जमीन स्थिर आणि सुपीक बनवते. तुमच्या मातीचा आणि पीक उत्पन्नात नक्कीच फायदा होईल.
जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता
शेतकरी बांधवानो, शेतात योग्य पद्धतीने गांडूळ खताचे नियोजन केल्यास शेतातील माती भुसभुशीत राहते, त्यामुळे माती अधिक वेळ आणि जास्त प्रमाणात शेतात पाणी धरून ठेवते. हे शेतातील पिकांसाठी उपयुक्त ठरते.. गांडूळ खत वापरल्याने त्यातील “ह्युमस” नावाचा सेंद्रिय पदार्थ जो शेतातील मातीच्या कणांशी जोडला जातो.
ह्युमस हा मातीतला ओलावा टिकवून ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो, ज्यामुळे शेतातल्या मातीवर आणि पिकांवर याचा सकरात्मक परिणाम पाहायला मिळतो. ज्यामुळे शेतात सिंचनावर होणार खर्च कमी होण्यास मदत होते. ज्या क्षेत्रात पाण्याची कमी असेल अशा भागात हे खूप उपयोगी आहे.
जमिनीचा pH (पी.एच.) सुधारतो
मातीतला सामू (pH) म्हणजे मातीतील अॅसिडिटी म्हणजे मातीला खूप आंबट बनवणे किंवा अल्कलाइनिटी म्हणजे मातीला खूप घट्ट बनवणे. हे जमिनीत वाढले तर जमिनीच्या पोषणतत्त्वांमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे याचा परिणाम आपल्याला पिकांवर आणि येणाऱ्या उत्पन्नावर दिसतो.
जमिनीचा pH (पी.एच.) सुधरवण्यासाठी गांडूळ खातात आढळणारा “ह्युमस” मदत करतो. ह्युमस हा जमिनीतील अॅसिडिटी किंवा अल्कलाइनिटी कमी करण्यास मदत करतो. ज्यामुळे माती एकदम भुसभुशी राहते आणि सर्व प्रकारच्या पिकांसाठी छान परिस्थिती निर्माण करते.
जमिनीतला pH (पी.एच.) संतुलित असेल तर पिकांना योग्य प्रमाणात नत्र (नायट्रोजन), स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्मद्रव्य मिळतात. त्यामुळे पिकांची वाढ आणि उत्पादन वाढते.
मातीचा कस टिकून राहतो
मित्रांनो, शेतात गांडूळ खत वापरल्याने मातीतील पोषणतत्त्वे वर्षानुवर्षे टिकून राहण्यास मदत होते. मुख्य म्हणजे, सेंद्रिय खतात आढळणारा ह्युमस हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. तो जमिनीला भूसभुशीत आणि हलकी बनवतो.
यामुळे जमिनीतील सूक्ष्मद्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण राखण्यास मदत होते, आणि पीक हे उत्तम आणि उच्च दर्जाचे येतात. गांडूळ खताचा वापर केल्याने जमिनीतील जीवाणूंची संख्येत वाढ होते. त्यामुळे पिकांना योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश हे पोषण लवकर उपलब्ध होण्यास मदत होते.
त्या मुळे मातीचा कस टिकून राहतो. त्यामुळे रासायनिक खत वापरण्याची गरज कमी होते, आणि मातीची नैसर्गिक सुपीकता कायम राहते.
गांडूळखत बनवण्यासाठी लागणारे वस्तू
1. गांडूळ (Earthworms) :- मित्रांनो, गांडूळ खत निर्माण करण्यासाठी योग्य गांडूळ निवडणे गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही लिव्हिंग स्टोन किंवा रेड वॉर्म (Red Wiggler) या जातीचे गांडूळ निवडू शकता. चांगले गांडूळ कमी दिवसात चांगल्या दर्जाचे खत बनवण्यासाठी उपयोगी असतात.
2. कचरा:- वरती सांगितल्या प्रमाणे तुम्ही कचरा वापरू शकता. कचरा हा बारीक असावा आणि लवकर कुंजेल असा असावा. त्यात प्लास्टिक तुकडे जाणार नाही याची काळजी घ्यावी.
3. पाणी: – तुम्ही साठवून ठेवलेल्या कचऱ्याला कुजण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन असणे आवश्यक आहे.
4. छोटा कंटेनर, बॉक्स किंवा खड्डा:- योग्य जागेची निवड करावी जिथे तुम्ही खताचे नियोजन करू शकता. घराजवळ जागा तयार करताना काळजी घ्या, जास्त सडणार कचरा म्हणजे वास येणार कचरा टाळावा.
गांडूळखत बनवण्याची सोपी प्रक्रिया
1: – आधी ठरवून घ्या तुम्हाला खत कुठे बनवायचे आहे. शेतात बनवत असाल तर तुम्ही खडा खंदून त्यात खत तयार करू शकता. किंवा बॉक्स घेऊन सुद्धा तुम्ही खत बनवू शकता. तुम्ही बॉक्स निवडला तर त्याला खाली आणि बाजूला छिद्रे असावी. छिद्रे हे हवा आणि पाण्याच्या ओलाव्याचे संतुलन टिकून ठेवण्यास मदत करतात.
2: – सेंद्रिय कचऱ्याची निवड करून गोळा करा आणि त्याचे बारीक कण बनवून ते खड्यात किंवा बॉक्समध्ये भरा. एक गोष्ट लक्षात घ्या, कचरा हा जास्त जाड नसावा आणि प्लास्टिक तुकडे नसणार याची काळजी घ्या.
3: – आता खड्यामधून किंवा बॉक्समधून कचरा काढून त्यात गांडूळ सोडा. आणि नंतर ठराविक अंतराने थर टाकत चला, त्यासोबत पाणी सुद्धा देत चला. पाण्याचे प्रमाण हे खात ओलसर राहील इतकेच द्यावे. पाण्यामुळे खताचा गाळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
4: – मित्रांनो, टाकलेला कचरा सडू लागल्यानंतर त्यात प्रत्येक 15-20 दिवसांनी थोड्या प्रमाणात सेंद्रिय कचरा टाकत रहा. सोबतच टाकलेला कचरा हलवत रहा म्हणजे तो मिक्स होईल आणि त्याचा ओलावा टिकून राहील. कधी कधी कचऱ्याचा चढ तयार करा म्हणजे त्यात गांडूळ जातील.
5: – मित्रांनो, साधारण २ ते ३ महिन्यांमध्ये तुमचे गांडूळखत तयार होईल. जर खताचा वास येत असेल तर त्याला हवा येईल अशा प्रकारे त्याला ठेवा. म्हणजे त्यात हवा शिरेल. खताचा वास कमी झाला की त्याचे मऊ कण तयार होतील.
असे बारीक कण दिसायला लागले की समजून घ्या गांडूळखत तयार झाले आहे. आता ते खत शेतात आणि बगिच्यात पसरवून वापरता येईल. त्या मुळे जमिनीच्या मातीची सुधारणा चांगली होईल.
ही प्रक्रिया वापरून तुम्ही घरच्या घरी गांडूळ खत बनवू शकता.
निष्कर्ष (Conclusion)
गांडूळखत हे शेतीसाठी सर्वात उत्तम आणि अमूल्य मानले जाते. गांडूळखताचे खूप फायदे आहेत. यामुळे जमिनीची पोत सुधारते, उत्पादनात वाढ होते, आणि महत्वाचे म्हणजे पर्यावरण पूरक मानले जाते.
गांडूळखतामुळे शेतीचा pH संतुलित राहतो, त्यासोबत माती भुसभुशीत असल्याने मातीत हवा आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि जमीन सुपीक बनण्यास मदत मिळते.
योग्य कचऱ्याची निवड, गांडूळांची जात, त्यासोबत कचऱ्यावर योग्य प्रक्रिया केली असता तुम्ही एक उच्च दर्जाचे जैविक खत तयार करू शकता. तयार केलेल्या खातात “ह्युमस” हा शेतातील मातीच्या पोषणासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जो जमिनीच्या पाण्याची क्षमता आणि टिकाव सुधारण्यास मदत करतो.
शेतकरी बांधवांनो, घरी किंवा शेतात गांडूळखत तयार करणे खूप सोपे असते. त्यामुळे तुमच्या आजुबाजूच्या सेंद्रिय कचऱ्याचा पुनर्वापर सुद्धा केला जातो. शेतीसाठी गांडूळखत हा पर्यावरणपूरक उपाय आहे.