Home  |  प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी मध्ये मोठे बदल ही सर्व कागदपत्रे लागणार

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी मध्ये मोठे बदल ही सर्व कागदपत्रे लागणार

Add Krushi Marathi as a Trusted Source Krushi Marathi

पीएम किसान योजनेचे उद्दिष्ट । प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचे उद्दिष्ट

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती आणि शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशात शेतकरी समुदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या अभावी किंवा कधी कधी जास्त पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.

भारतातील शहरी आणि ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना देशातील सामाजिक आणि आर्थिक असमानतेमुळे शेतकरी वर्गाला अनेक प्रकारच्या आर्थिक संघर्षांचा सामना करावा लागत आहे.. स्वातंत्र्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकरी समुदायाला उन्नत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत.

भारत सरकारने 2018 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली आणि आता पर्यंत या योजनेमार्फत करोडो शेतकऱ्यांना याचा डायरेक्ट फायदा झाला आहे.

आता पर्यंत 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून डायरेक्ट आधार लिंक बँक खात्यात पैसा जमा करण्यात आले आहेत. भारत सरकारचे लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने नवीन नियमावली आणि काही नवीन कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. या योग्यता पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • लहान आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
  • शेतकरी कुटुंबाकडे शेतीयोग्य जमीन असलेले सर्व शेतकरी बांधव या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात.
  • शेतकरी लाभार्थी हा भारतीय नागरिक असावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

स्व:ता पीएम किसान पोर्टलवर फॉर्म भरत असणार, खाली दिलेले कागदपत्र हैं तुम्हाला अपलोड करावे लागतील. पाहू या कोण कोणते कागदपत्र या योजनेच्या पात्रतेसाठी लागणार आहेत.

  • मागील तीन महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सही आणि शिक्का असलेला 7/12 उतारा असणे आवश्यक आहे.
  • जमीन नोंदणीचा फेरफार (धारणा 01/02/2019 पूर्वी लाभार्थ्यांच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे. किंवा अपवाद, वारसा हक्काने मिळालेली जमीन असेल त्या साठी दुसरे कागदपत्र लागू शकते).
  • 2019 नंतर जमीन विकत घेतली असेल तर ते लाभ घेऊ शकत नाही.
  • वारस नोंद फेरफार - 01/02/2019 नंतर मयत नावावरून जमीन वारस म्हणून आली असेल तर, तशी फेरफार सुद्धा द्यावी लागेल.
  • लाभार्थी शेतकरी, त्याची पत्नी आणि 18 वर्षांखालील अपत्यांचे आधारकार्ड (हे सर्व एका पानावर स्कॅन करावीत) पोर्टलवर अपलोड केलेली माहिती कृषी अधिकाऱ्यांकडून तपासली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांना या योजनेसाठी अँप्रोव्ह केले जाईल.
  • आधार कार्डशी संलग्न बँक पासबुक.
  • स्व:ताचा पासपोर्ट साइज फोटो.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेचा लाभ घेण्यासाठी PM Kisan पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. चला पाहू या अर्ज कसा करावा.

1) पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईटची लिंक -   येथे क्लिक करा

2) पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला "New Farmer Registration" या बटणावर क्लिक करायचं आहे.

3) तुमच्या समोर एक नवीन पान उघडेल. तुम्हाला इथे तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि राज्य विचारलं जाईल.

4) माहिती चुकीची नसावी. नंतर कॅप्चा भरून "Get OTP" वर क्लिक करायच आहे.

5) तुम्ही दिलेल्या मोबाइलवर OTP येईल. तो भरून सबमिट बटनावर क्लिक करा.

6) तुम्हाला विचारले जाईल रेजिस्ट्रेशन चालू ठेवायचं आहे का. तुम्हाला "Yes" पर्यायावर क्लिक करायचं आहे.

7) तुमच्या समोर आता नवीन फॉर्म ओपन होईल. त्यात सर्व माहिती भरायची आहे आणि लागणारे सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत.

  • आधार क्रमांक.
  • मोबाईल क्रमांक.
  • राज्य, जिल्हा, ब्लॉक, गाव.
  • बँक खातेची माहिती.
  • जमिनीची माहिती.
  • आवश्यक असणारी सर्व जमिनीची आणि स्वतःची कागदपत्र.
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक.
  • स्कॅन करून अपलोड करणे

8) नंतर खाली दिलेल्या "Submit" बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे.

9) नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक "किसान ID" दिला जाईल.


प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत नोंदणी नंतर

नवीन नोंदणी नंतर तुमचा फॉर्म हा कृषी विभागा तर्फे फेरफार केला जाईल. सर्व माहिती आणि जमा केलेली कागदपत्र बरोबर असतील तर तुम्हाला प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजने अंतर्गत हफ्ते भेटायला चालू होतील.

जर तुमचा फॉर्म हा कृषी विभागा तर्फे नाकारला गेला तर तुम्ही CSC सेंटर ला किव्हा कृषी अधिकाऱ्यांना भेटून पुन्हा फॉर्म ची तपासणी करून. तुम्ही अँप्रोव्ह घेऊ शकता.

अशी घ्या काळजी जेणेकरून तुमचा फॉर्म बाद होणार नाही.

1) शेतकऱ्याने स्वतःच्या आणि घरातील सदस्यांचे आधार कार्ड अपडेटेड ठेवावे, आणि एका पानावर सर्व आधार कार्ड प्रिंट करून घ्यावे.

2) ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांचे स्वतःचा मोबाईल नंबर वापरणे. जेणेकरून पुढे जाऊन फॉर्म आणि पेमेंट स्टेटस सहज चेक करू शकतो.

3) 7/12 उतारा हा जास्त जुना नसावा. खात्री करून घ्या की उतारा हा मागील ३ महिन्यातील आहे कीनाही; नसेल तर नवीन उतारा काढून घेणे.

4) कागदपत्र ही स्पष्ट दिसणारी हवी. जेणेकरून अधिकाऱ्यांकडून पडताळणी करताना बाद होणार नाही.

5) फॉर्म भरताना नवीन वारस नोंद फेरफार काढून घेणे.

6) तुम्हाला योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर कृषी अधिकाऱ्यांना भेटून, तुमच्या प्रश्नांचे निवारण करून घ्या.

निष्कर्ष (Conclusion)

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. या योजनेत अधिक पारदर्शक आणि सुव्यवस्थित पद्धतीने शेतकरी बांधवांना लाभ मिळावा यासाठी सरकार वेळोवेळी योजनेत बदल करत असते जेणेकरून योग्य लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळावा.

म्हणून या वेळेस योजनेच्या नियमांमध्ये बदल करून काही नवीन कागदपत्रे तयार करून अर्ज करणे किंवा e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही वरील माहितीमध्ये किसान सन्मान निधी योजनेत झालेले बदल वाचू शकता.

FAQs

प्रश्न 1: PM किसान सम्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली?
उत्तर: केंद्र सरकारने 2018 मध्ये लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली.

प्रश्न 2: 2019 नंतर शेती विकत घेतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील का?
उत्तर: केंद्र सरकारने योजनेच्या नियमानमध्ये काही बदल केले आहेत. त्या अनुसार नवीन शेती विकत घेतलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

प्रश्न 3: योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक आहे का?
उत्तर: हो, योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक आहे.

प्रश्न 4: PM किसान सम्मान निधी योजनेत किती लाभ दिला जातो?
उत्तर: PM किसान सम्मान निधी योजनेत 6,000 रुपये वर्षाला आणि प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपये असे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

प्रश्न 5: पीएम किसान 19वा हप्ता कधी येणार?
उत्तर: PM किसान सम्मान निधी योजनेत 19वा हप्ता 2025 मध्ये येईल.

प्रश्न 6: PM किसान सम्मान निधी योजनेत मोबाईल क्रमांक बदलू शकतो का?
उत्तर: हो “Update Mobile Number” या बॉक्सवर क्लिक करून तुम्ही तुमचा जुना मोबाईल क्रमांक बदलू शकता.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet

Related Blogs


Nddb dairy plan maharashtra 19 districts

महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांत NDDB च्या मदतीने पशुपालकांसाठी गाय-भैंस आणि चारा योजना

Maharashtra heavy rain alert to next 3 days

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा; सरकारकडून सतर्कतेची सूचना

Nashik farmer beekeeping success story

नाशिकचा शेतकरी बनला कोट्यवधी, मधमाश्यांच्या पेट्यांतून उभा केला यशस्वी ब्रँड; 80 हजार शेतकऱ्यांना दिला ...

Panand mukti yojana maharashtra

पाणंद मुक्तीचा मेगा प्रयोग: शेत रस्त्यांचा प्रश्न सुटणार

Revenue department farm road campaign

महसूल विभागाची शेतरस्ता मोहीम: शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Pomegranate production maharashtra dominates india

Pomegranate Production: डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम

Maharashtra rain forecast orange yellow alert

Maharashtra Weather Update : IMD ने काय दिला उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा ...

Namo shetkari yojana 7th installment

नमो शेतकरी योजनेसाठी १९३२ कोटी मंजूर: शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लवकरच लाभ

Maharashtra rain weather update august 2025

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार: २७ ऑगस्ट २०२५ चा हवामान अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी टिप्स

Beed heavy rainfall crop loss 2025

बीडमध्ये भारी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले: कपास, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra heavy rain alert 2025

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा: गडचिरोली, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट

Jalgaon kharif crop crisis 2025

जळगावात खरीप पिकांचे संकट: पावसाअभावी शेतकऱ्याने मुगाच्या पिकावर फिरवले रोटाव्हेटर