लाडकी बहीण योजनेत पुन्हा नवीन अपडेट | New update in Ladki Bahin scheme
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. योजनेत पात्रता निकष आणि अटींविषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली होती. तरी सुद्धा ज्या महिलांना खरोखरच गरज होती त्यांच्या सोबत राज्यातील इतर महिलांनी सुद्धा फॉर्म भरला.
आणि निवडणूक समोर असल्याने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांनी निकष आणि अटींना बाजूला ठेवून सर्व फॉर्म अँप्रोव्ह करत राज्यातील लाखो अपात्र महिलांनासुद्धा पात्र ठरवून लाभ देण्यात आला. आणि याचाच परिणाम हा थेट सरकारच्या तिजोरीवर पडला.
आता सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेत पुन्हा नवीन निकष आणि अटी लावून योजनेला अजून पारदर्शक बनवण्याचे नवीन सरकारने ठरवले आहे. त्यानुसार सरकार आता कामाला सुद्धा लागले आहे. आणि गावातील आणि शहरातील अंगणवाडी सेविकांमार्फत राज्यात नवीन सर्वे चालू केला आहे.
त्यात मुख्यतः महिलेच्या परिवाराकडे ४ चाकी वाहन आणि कुटुंबाचे २.५ लाखांपर्यंत उत्पन्न आहे की नाही, हे पाहिले जाईल. ज्या महिला या अटींना पूर्ण करतील, त्यांनाच या पुढे योजनेचा लाभ मिळेल, असे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
त्यासोबतच महिला इतर दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील, म्हणजे संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) अशा कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यांना मागील म्हणजे ७व्या हफ्त्यापासून अपात्र ठरवत त्यांचे हफ्ते बंद करण्यात आले आहेत.
राज्यात अशा ६.५ लाख लाभार्थी महिला होत्या. त्यासोबत ५-६ लाभ महिलांची पात्रता तपासून आणि राज्यातील बाकी महिलांनी स्वतः योजनेतून माघार घेतली आहे.
लाडकी बहीण योजनेत केलेले नवीन बदल
1) लाभार्थी महिलेच्या परिवाराचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल अशा सर्व महिलांना योजनेमधून वगळण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची पडताळणी ही राज्यातील प्राप्तिकर विभागामार्फत करण्यात येणार आहे.
राज्यात अडीच लाख उत्पन्नाची अट आधीपासून होती, पण त्या अटीकडे दुर्लक्ष करत महिलांनी अर्ज केला आणि योजनेचा लाभ घेतला. अशा महिलांना पुन्हा वगळण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेऊन राज्यातील अपात्र महिलांना ओळखण्यात मदत मिळेल आणि बोगस पद्धतीने भरलेले अर्ज वगळण्यास मदत मिळेल.
2) योजनेत नवीन नियम लागू केला आहे. आता राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी करणे आणि लाभार्थी हयात दाखला जमा करणे बंधनकारक असणार आहे. ई-केवायसी आणि हयात दाखल्याच्या आधारे महिलांना लाभ दिला जाणार आहे, जेणेकरून लाभ हा चुकीच्या लाभार्थीला मिळता कामा नये.
3) लाडकी बहीण योजनेसोबत राज्यातील इतर दुसऱ्या सरकारी योजनांचा लाभ घेत असतील म्हणजे संजय निराधार योजना, नमो शेतकरी महासम्मान निधी योजना अशा महिलांना सुद्धा योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे.
4) लाभार्थी महिलेच्या परिवारात चार चाकी गाडी असेल, राज्यातील अशा सर्व महिलांना योजनेतून अपात्र ठरवून वगळण्यात येणार आहे.
८वा हफ्ता मिळण्याबाबत अपडेट
नवीन नियमानुसार महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात DBT मार्फत पैसे जमा झाले पाहिजे. पण अद्याप भरपूर महिलांना फेब्रुवारी महिन्याचा ८वा हफ्ता मिळालेला नाही. त्याविषयी उपडेट अशी आहे. पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होत असल्याने काही राज्यातील महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. जसजसे पात्र महिलांची यादी सरकारला दिली जात आहे, तसतसे पैसे वाटप सुरु आहे.
आठव्या हफ्त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री माननीय अजित पवार साहेब यांनी ३ हजार ५०० कोटी मंजूर केले आहेत. असे स्वतः उपमुख्यमंत्री साहेबांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. त्यामुळे आठवा हफ्ता हा राज्यातील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या २ ते ३ दिवसात जमा होईल.
लाडकी बहीण योजनेविषयी थोडक्यात बातम्या
1) राज्यातील 6.5 लाख लाडक्या बहिणी राज्यात सुरु असलेल्या नमो शेतकरी सम्मान निधी योजना, संजय निराधार योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना आढळून आले आहेत, असे राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
2) त्यासोबतच राज्यातील 16.5 लाख महिलांच्या अर्जावरील नावात आणि ज्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत अशा बँक खात्यावरील महिलांच्या नावांमध्ये तफावत आढळून आली आहे.
3) राज्यातील महिलांना ८वा हफ्ता हा नवीन निकषानुसार फक्त पात्र महिलांना देण्यात येणार आहे.
4) राज्यातील ज्या जिल्यांची अर्ज (Application) पळताडणी (Verification) पूर्ण झाली आहे आणि महिला व बाल कल्याण विभागाकडे यादी पाठवण्यात आली आहे, अशा महिलांच्या बँक खात्यात १८ फेब्रुवारीपासून ८वा हफ्ता जमा होण्यास सुरूवात झाली आहे.