Tuesday, 17 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  शेतकरी यशोगाथा: नगदी पिकावर ५ हजार रुपये खर्च करून रताळे शेतीमधून लाखो रुपये कमवत आहेत

शेतकरी यशोगाथा: नगदी पिकावर ५ हजार रुपये खर्च करून रताळे शेतीमधून लाखो रुपये कमवत आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारंपारिक शेतीतील अडचणी आणि बदलाची गरज

पूर्वी देशातील शेतकरी बांधव मुख्यतः गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी पारंपरिक पिके आपल्या शेतातून घेत असत. मात्र शेतातील आणि राज्यातील सतत होत असलेल्या हवामानातील बदल, पाण्याअभावी सिंचनाच्या समस्या आणि बाजारातील पिकांना मिळणारा कमी बाजारभाव यामुळे पिकांमधून खर्च वजा करून नफा मिळवणे सुद्धा शेतकरी बांधवांना अवघड आहे.

देशात खतांच्या वाढत्या किमती, त्यासोबतच मजुरीचे दर हे सर्व पाहता शेतीत लागणारा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी. हीच शेतकऱ्याची बिकट परिस्थिती पाहता, देशातील शेतकरी शेती करण्याचे नवीन पर्याय निवडू शोधू लागले आहेत.

त्यात मुख्य पर्याय नगदी पीक कमी कालावधीत अधिक नफा मिळवू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबत नगदी पिकांची शेती करण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. त्यातच एक नगदी पीक म्हणजे गोड रताळे, शेतकरी बांधवांना रताळे लागवड हा खूप फायदेशीर पर्याय ठरू शकतो. हेच बाबुलगाव येथील सुधीर चव्हाण यांनी ओळखले.

प्रत्यक्ष सुधीर चव्हाण यांचा अनुभव आणि यशोगाथा

सुधीर चव्हाण सांगतात की पूर्वी ते पूर्णपणे पारंपारिक शेती करायचे, ज्यामधून ते कसे तरी त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. पण गेल्या १ दशकापासून सुधीर चव्हाण हे त्यांच्या शेतात रताळ्याची लागवड करत आहेत. त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला.

ते म्हणतात, "पारंपारिक शेतीमध्ये उत्पादन खर्च खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि मिळणारा नफा हा खूप कमी मिळतो. पण नगदी पिकांमध्ये योग्य नियोजन केल्यास मोठ्या प्रमाणात नफा पाहायला मिळतो. रताळ्याच्या शेतीत खर्च आणि मेहनत कमी लागते, ते सांगतात की रताळ्याला जास्त पाण्याची किंवा खतांची आवश्यकता भासत नाही. त्यासोबत मुख्य म्हणजे इतर नगदी पिकांपेक्षा रताळे पिकाची जास्त काळजी घेण्याची गरज भासत नाही आणि उत्पन्न जास्त प्रमाणात मिळते. भारतातील बाजारांमध्ये हिवाळ्यात गोड रताळ्याची मागणी जास्त वाढते. आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे मी आता माझ्या शेतात नगदी शेतीवर जास्त भर देत आहे."

सुधीर चव्हाण रताळे पिकामधून वर्षाला तीन लाख रुपयांची कमाई काढतात.

सुधीर चव्हाण सांगतात, त्यांना एकरा मागे रताळ्याचे भरपूर उत्पादन मिळत आहे. आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही मिळत आहे. त्यांना गोड रताळा लागवडीचा खर्च हा प्रति एकर सुमारे पाच हजार रुपये मात्र येतो.

पण त्यांना रताळे विकून मिळणारे उत्पन्न हे लाखोंमध्ये आहे. सुधीर चव्हाण यांनी सांगितले की, त्यांना मागच्या वर्षी १.५ एकर रताळ्याच्या शेतातून ६०० पोते रताळे आले. ते रताळे बाजारात विकून त्यांना सुमारे ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

रताळ्याचा बाजारभाव

सध्या बाजारात रताळ्याचा दर प्रति किलो २० ते ५० रुपये आहे. मागणी जास्त असल्याने योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक नफा मिळतो. सुधीर चव्हाण यांच्या मते, एका एकरातून सरासरी १० ते १५ टन उत्पादन मिळू शकते. योग्य विक्री व्यवस्थापन केल्यास १ एकरातून ४ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळते.

बाजार समिती शहराचे नाव रताळ्याची जात परिमाण आवक ( क्विंटल ) किमान दर (रु.) कमाल दर (रु.) सरासरी दर (रु.)
पुणे लोकल क्विंटल 158 2000 4000 3000
मुंबई लोकल क्विंटल 627 1600 3000 2300
नागपूर -- क्विंटल 100 1500 1800 1700

इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

सुधीर चव्हाण हे रताळ्याच्या नगदी शेतीत यशस्वी झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना रताळ्याच्या शेतीविषयी मार्गदर्शन करण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी त्यांच्या परिसरातील अनेक शेतकरी बांधवांना नगदी पिकाची माहिती देत, जास्तीतजास्त शेतकरी नगदी पिकांकडे वळावे यासाठी प्रेरित करण्याचे कार्य सुधीर चव्हाण यांनी केले आहे.

सुधीर चव्हाण यांचे मत असे आहे की, "शेती हा तोट्याचा व्यवसाय नसून जर शेती ही चांगल्या पद्धतीने आणि योग्य नियोजनाने केली तर नक्कीच त्यामधून प्रचंड नफा मिळवू शकतो. शेतकरी बांधवांनो, पारंपारिक शेतीपेक्षा नगदी शेतीत कमी खर्च आणि कमी मेहनत करून जास्त नफा मिळतो. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबत नगदी पिकांचाही विचार करायला हवा."

शेतीमध्ये बदल घडवा आणि जास्त नफा कमवा

सुधीर चव्हाण यांना मिळणारे यश हे देशातील इतर शेतकरी बांधवांसाठी एक प्रेरणादायी आहे. त्यांनी कशा प्रकारे पारंपारिक शेतीला बाजूला सरकवत नगदी पिकाची योग्य निवड करून कमी खर्चात, कमी मेहनतीत आणि त्यासोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी अभ्यास करून हे यश मिळवले.

ज्याप्रमाणे सुधीर चव्हाण यांनी हिवाळ्यातील रताळ्याची मागणी पाहता हे पीक निवडले, त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांनी सुद्धा पारंपारिक शेतीसोबत आपल्या शेतात नवीन प्रयोग, तंत्रज्ञान आणि आपल्या आजूबाजूच्या बाजारातील गरजेनुसार आपल्या शेतात नियोजन करायला हवे.

शेतकऱ्यांनी रताळ्यासारखी दुसरी नगदी पिके आपल्या शेतात घेतली तर नक्कीच देशातील शेतकरी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतात. त्यामुळे आपल्या शेतात योग्य नियोजन, नवीन आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत आणि शेती करण्याचे नवीन पर्याय स्वीकारल्यास शेतकरी यशस्वी होऊ शकतो. बदल घडवा आणि अधिक कमवा!

रताळ्याच्या सुधारित जाती

भारतात सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यामधून देशातील शेतकरी लाखोंचा नफा मिळवत आहेत. यासाठी शेतकरी वर्षा, श्री नंदिनी, श्रीरत्न, श्री वर्धिनी, राजेंद्र रताळे ५, पुसा पांढरा आणि पुसा सुनहरी सारख्या सुधारित वाणांमुळे चांगला फायदा होताना दिसतोय.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet