Wednesday, 18 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे हफ्ते थांबले आहेत. हफ्ते थांबण्यामागचे कारण काय असू शकते? पाहू सविस्तर

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे हफ्ते थांबले आहेत. हफ्ते थांबण्यामागचे कारण काय असू शकते? पाहू सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पीएम किसान योजनेसाठी पात्रता कोणती आहे?

पीएम किसान सन्मान निधी योजना १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी सातबारा धारक म्हणजे ज्यांच्या नावाने ७/१२ आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना देशात लागू करण्यात आली. आधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक आणि शेतीविषयी माहिती दिलेल्या सर्व शेतकरी बांधवांना योजनेत लाभ दिला जात होता.

मग काही वर्षांनी सरकारने नवीन निकष लावले, बँक ईकेवायसी, आधारकार्ड बँक क्रमांकासोबत जोडलेला हवा, पीएम किसान योजनेची ईकेवायसी या प्रकारच्या वेगवेगळ्या तपासणीमुळे लाखो शेतकरी अपात्र ठरले. बाकी शेतकऱ्यांना पुराव्या अभावी अपात्र ठरवण्यात आले.

पीएम किसान योजनेचे पैसे का थांबले, याची काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे:

१) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. आणि तुमच्या नावे देशात शेती करण्यायोग्य जमीन असणे आवश्यक आहे. फेरतपासणीमध्ये कागदपत्रांची पूर्तता झाली नसेल अशा शेतकऱ्यांचे हफ्ते थांबवण्यात आले आहेत.

२) नवीन नियमानुसार एका शेतकरी कुटुंबातील एकाच सदस्याला लाभ मिळणार आहे. त्यामुळे परिवारातील इतर लाभार्थ्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे आणि त्यांच्या हफ्ता बंद करण्यात आला आहे. आधी एकाच कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. पण नवीन निकषानुसार कुटुंबातील इतर व्यक्तींना अपात्र करण्यात आले आहे आणि एका कुटुंबातून फक्त एकाच शेतकऱ्याला लाभ हा दिला जातोय.

३) नवीन नियमानुसार जे शेतकरी संविधानिक पदावरील असतील किंवा होते, अशा सर्व शेतकरी बांधव योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत आणि ते अपात्र आहेत. संविधानिक पदावर कोणते शेतकरी असतील तर ते अपात्र आहेत. यात गावचा सरपंच, तालुका जिल्ह्याचा आमदार, खासदार, कोणत्याही विभागातील सरकारी अधिकारी इत्यादी शेतकरी अपात्र असणार आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी अर्ज केला असेल आणि नवीन पडताळणीमध्ये सापडला असला तर त्यांचे हफ्ते बंद करण्यात आले आहेत.

४) देशातील बहुतेक शेतकऱ्यांच्या नावावर २ - ३ खाते उतारे असतात. देशात काही शेतकऱ्यांनी एकाच नावाने २ ते ३ वेळा नोंदणी केली होती. यामुळे केंद्राच्या कृषी विभागाकडे या योजनेच्या यादीत डुप्लिकेट रेकॉर्ड तयार झाले होते. नवीन निकषांनुसार सरकारने असे सर्व डुप्लिकेट अर्ज रद्द करून त्या शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेत मिळणारा हफ्ता थांबवण्यात आला आहे.

५) योजनेत शेतजमिनीविषयी काही नियम आहेत. ज्या शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल, ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. शेतविकलेल्या शेतकऱ्याच्या नावे शेत नसेल तर तो शेतकरी अपात्र आहे आणि त्याचा अर्ज रद्द करून हफ्ता बंद करण्यात आलेला आहे. काही शेतकऱ्यांचे शेती वर्ग ३ मध्ये म्हणजे संस्था किंवा समूहाच्या नावावर आहे, अशा वेळेस शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

६) काही शेतकरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कर्मचारी आहेत तर काही शेतकरी निमशासकीय कर्मचारी आहेत. अशा सर्व शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, ते अपात्र आहेत. केंद्र सरकारच्या यादीत असे शेतकरी सापडले असता, त्यांचे हफ्ते थांबवले जातात आणि अर्ज ब्लॉक करण्यात येतो.

७) शेतकरी बांधवांनो, जर तुमचा आधार क्रमांक आणि बँक खात्याच्या माहितीमध्ये काही चुका असतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता या चुका कोणत्या असू शकता? तुमच्या नावात बदल, तुमचा आधार क्रमांक बँक खात्यासोबत लिंक नाही, किंवा तुमच्या बँक खात्याची ईकेवायसी झालेली नाही, अशा कारणांमुळे सुद्धा तुमचा निधी थांबवला जाऊ शकतो.

८) देशातील शेतकरी करदाता असेल म्हणजे आयकर (Tax) भरत असेल. अशा शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यांचे अर्ज अपात्र ठरवून त्यांचे हफ्ते बंद करण्यात आले आहेत.

९) देशातील लाखो लोकांनी चुकीच्या पद्धतीने योजनते अर्ज करून योजनेचा लाभ घेतला. योजनेसाठी ई-केवायसी बंधनकारक केल्यापासून अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती सरकारसमोर येऊ लागली. त्यानंतर सरकारने असे सर्व अर्ज रद्द करून त्यांचा लाभ बंद केला.

पीएम किसान योजनेत अर्जाची तपासणी आणि अर्ज सुधारणा प्रक्रिया सुरू केली आहे.

पीएम किसान योजनेत लाखो अर्ज हे अपात्र असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने योजनेतील प्रत्येक शेतकऱ्याचे अर्ज स्थानिक गावपातळीवर तपासण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून गरीब आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांचा योजनेचा लाभ मिळावा. पण यात काही शेतकरी पात्र असून त्यांचे हफ्ते बंद झाले आहेत.

त्यात बँक खात्याबद्दल चुका, नावाबद्दल चुका, जमीन नोंदणीबद्दल, अजून इतर चुकांमुळे शेतकरी हफ्त्यांपासून वंचित आहे. पण कृषी विभागाने गावपातळीवर अशा सर्व अपात्र शेतकऱ्यांची यादी पाठवली आहे. गावातील कृषी सहाय्यक आणि तलाठी हे अर्ज तपासतील आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी पुन्हा वरती पाठवली जाईल. ज्या शेतकरी पात्र आहेत पण काही कारणामुळे यादीत नाव आले आहे, अशा शेतकऱ्यांचे कागदपत्र तपासून त्यांचा हफ्ता सुरु करण्यात येईल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet