किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यामागील कारणे
आपण पाहतो की ग्रामीण भागात शिक्षणाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांच्या कागतपत्रांमध्ये त्रुटी निर्माण होतात. कधी शेतकऱ्यांकडून चुकीची माहिती दिली गेल्याने शेतीविषयी कागपत्रावर ती चुकीची माहिती लिहिली जाते.
किंवा देशातील काही भ्रष्ट अधिकारी मुद्दाम म्हणजे किंवा नकळत चुका करतात आणि त्याचा परिणाम हा शेतकरी बांधवांना भोगावा लागतो. कागदपत्रातील त्रुटी हे सुद्धा किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याचे मुख्य कारण आहे.
शेती मालकीतील बदल म्हणजे शेती विकून ती दुसऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर जाणे, वारस बदल किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल अशा कारणांमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.
बँक खात्यातील त्रुटी म्हणजे नावात बदल, ईकेवायसी केलेली नसेल किंवा इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. काही शेतकऱ्यांना सुरुवातीचे हफ्ते मिळतात, पण नवीन निकषानुसार त्यांचे हफ्ते बंद झाले.
यामुळे शेतकरी गावातील तलाठी, तालुक्यातील तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ करून लवकरात लवकर निर्माण झालेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून लवकरच त्यांना सुद्धा इतर शेतकऱ्यांप्रमाणे योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात व्हावी.
योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी नवीन संधी: १५ एप्रिलपासून नवीन नोंदणी प्रक्रिया
केंद्र शासनाने देशातील अशा सर्व वंचित शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी पुन्हा संधी देण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत सहभागी होण्यासाठी १५ एप्रिल २०२५ पासून शेतकऱ्यांसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
या अर्ज प्रक्रियेत सहभागी होऊन शेतकरी बांधव २ हजार रुपये आणि पुढील २०व्या हप्त्यांचा लाभ घेऊ शकतील. केंद्र सरकार लवकरच २०व्या हप्त्याविषयी निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करेल.
नवीन नोंदणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
1️⃣ शेतकऱ्याचे अपडेट असलेले आधार कार्ड.
2️⃣ बँक खाते क्रमांक (आधार कार्डसोबत संलग्न आणि ई-केवायसी झालेली)
3️⃣ मोबाईल नंबर (आधार कार्ड आणि बँक खात्याशी संलग्न असलेला)
4️⃣ जमीन नोंदणीचे कागदपत्रे
नवीन अर्ज कसा करावा?
शेतकरी बांधव, किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारचा वापर करून नवीन अर्ज सादर करू शकता. आपण दोन्ही प्रकार पाहू.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
1️⃣ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी विभागाने तयार केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in जा.
2️⃣ Farmers Corner मधून "नवीन शेतकरी नोंदणी" (New Farmer Registration) पर्याय निवडा.
3️⃣ आता आधार क्रमांक, चालू मोबाइल क्रमांक, तुमचे राज्य आणि कॅप्चा भरून "Get OTP" वर क्लिक करा.
4️⃣ मोबाईल क्रमांकावर आलेला OTP सबमिट करून अर्जाची पहिली प्रक्रिया पूर्ण करा.
5️⃣ पुढे शेतकऱ्याची व्यक्तिगत माहिती, त्याच्या नावावर असलेल्या जमिनीची माहिती आणि बँक खात्याची माहिती भरा. मग अर्ज सबमिट करा.
ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
1️⃣ ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तलाठी कार्यालय भेट देऊन तुम्ही नवीन अर्ज करू शकता.
2️⃣ तुमच्या विभागातील कृषी सहाय्यकांना भेटून तुम्ही ऑफलाइन अर्ज प्रक्रिया करू शकता.
3️⃣ तुमच्या नजीकच्या कॉमन सेवा केंद्र (CSC) ला भेट देऊनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.
4️⃣ अर्ज करण्यासाठी जाताना वर सांगितलेले सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जावे.