Tuesday, 17 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  शेतकरी यशोगाथा: केळी आणि पपई बागेतील टरबुज आंतरपीकातून एकरी दीड लाखांचे उत्पन्न

शेतकरी यशोगाथा: केळी आणि पपई बागेतील टरबुज आंतरपीकातून एकरी दीड लाखांचे उत्पन्न

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

फळबागेत केलेला नाविन्यपूर्ण प्रयोग

मोरेश्वर हे शेतात नवनवीन प्रयोग करण्यास प्राधान्य देतात. त्यांनी या वर्षी असाच एक प्रयोग केला आहे, मोरेश्वर यांनी सहा एकर शेतात नियोजन करून विविध पीक घेतले आहेत. यावर्षी त्यांनी ४ एकरमध्ये केळी आणि २ एकरमध्ये पपई लावली आहे. पपई आणि केळी लावण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे.

ते ठिबक आणि मल्चिंग पेपरचा वापर करतात. जेणेकरून जमिनीची धूप कमी होईल, शेतात तण वाढणार नाही, आणि पिकांना योग्य प्रमाणात जमिनीतील पोषणतत्त्व मिळत राहील. ठिबक केल्याने पाण्याची बचत होतेच, त्यासोबत इतर गोष्टींना लागणारे पाणी सुद्धा उपलब्ध होते.

त्यांनी पपई आणि केळीमध्ये टरबुजाचे आंतरपीक घेतले. यामुळे त्यांना मुख्य फळबाग पिकासोबत अतिरिक्त उत्पन्न मिळाले. त्यांना नजीकच्या बाजारात टरबुजाची विक्री करून एकरी दीड लाख रुपये उत्पन्न मिळवले. यामुळे मोरेश्वर यांनी केलेला हा नवीन प्रयोग यशस्वी ठरला आहे.

फळबागेत आंतरपीक आणि पिकांच्या व्यवस्थापनाचे महत्त्व

टरबूज पीक हे कमी काळात येणारे पीक आहे. टरबूजला मुख्यता मार्च महिन्यापासून मोठ्या प्रमाणात मागणी असते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात टरबूज पिकाचे नियोजन केले असता. मार्च पर्यंत टरबूज यायला सुरुवात होते.

मोरेश्वर यांनी टरबूजची मागणी आणि मार्केट भावाविषयी अभ्यास करून पारंपरिक फळबागेवर अवलंबून न राहता केळी आणि पपईच्या शेतात टरबूज हे आंतरपीक घेतले. मोरेश्वर यांना चार एकर क्षेत्रातील टरबूज विकून एकूण ६ लाख रुपये मिळाले आहेत.

तर मोरेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना चार एकर केली आणि दोन एकर पपईपासून जवळपास २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा त्यांचा अंदाज आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.

मोरेश्वर यांनी टरबूजेवर केलेला खर्च आणि निघालेलं उत्पन्न

मोरेश्वर यांनी केळी आणि पपई बागेत टरबूज लावले. टरबूज कमी दिवसात येणारे पीक आहे, त्यासोबतच त्याचे योग्य नियोजन करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. मोरेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका एकरात १५ ते २० टनापर्यंतचे टरबूजाचे उत्पादन मिळाले आहे.

त्यांना बाजारात टरबूजाला ८ ते १० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला. म्हणजे त्यांनी विकलेल्या एका एकरातील टरबूजांमागे त्यांना १ लाख ५० हजार रुपये मिळाले. त्यांना टरबूज लागवड करण्यासाठी, खते आणि फवारणी, शेतातील मजुरांची मजुरी आणि बाजारात मालाला पोहचवण्यासाठी वाहतूक खर्च असा संपूर्ण खर्च एकत्र केला असत

ा त्यांना ६० ते ७० हजार रुपये खर्च लागला आहे. हा संपूर्ण खर्च वजा केला असता एका एकरात त्यांना ७० हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. सहा एकराचे गणित केले असता त्यांना निव्वळ नफा ४ लाख २० हजार रुपये मिळाला आहे.

मोरेश्वर यांचे वर्षभर उत्पन्न मिळवण्याचे विशेष नियोजन विषयी

मोरेश्वर शेतीचे योग्य नियोजन करण्यात माहीर आहेत. त्यांना वर्षभर शेतीतून उत्पन्न कसे मिळेल हे नियोजन त्यांनी केले आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये टरबूज मधून उत्पन्न निघेल. त्यानंतर जुलैपर्यंत पपईचे उत्पादन त्यांना मिळेल. नंतर ऑक्टोबरपर्यंत केळीचे उत्पादन घेतील.

यामुळे त्यांच्याकडे वर्षभर उत्पन्न सुरू असते. मोरेश्वर यांच्या म्हणण्यानुसार, "धान शेतीला फळ बाग हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. फक्त शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात नवीन प्रयोग करण्याची तयारी ठेवली पाहिजे."

जोपर्यंत शेतकरी पारंपरिक शेती करेल, तोपर्यंत शेतकरी हा फक्त परिवाराची उपजीविका भागवेल. शेतकरी श्रीमंत होणार नाही. श्रीमंत होण्यासाठी शेतात नवीन प्रयोग करावे लागतील.

मोरेश्वर यांचे मनोगत

मोरेश्वर यांच्या मते, आपल्या शेतात योग्य प्रमाणात मुबलक पाण्याचे प्रमाण असेल तर फळबाग लागवड हा योग्य पर्याय असणार आहे. या मधून अधिक नफा शेतकरी मिळवू शकतो. पारंपरिक शेतीपेक्षा नवनवीन प्रयोग आणि आंतरपीक पद्धतीने केलेली शेती केव्हाही अधिक फायदेशीर ठरते.

मोरेश्वर सांगतात की टरबूज, केळी आणि पपई या फळांची मागणी वर्षभर असते आणि चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला पर्याय शोधून अधिक नफा कसा मिळवेल याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी करावा.

मोरेश्वर याना शासनाकडून मिळालेला सन्मान

मोरेश्वर हे त्यांच्या शेतात मागील भरपूर वर्षांपासून नवीन प्रयोग करत आहेत. त्यांच्या अशाच नाविन्यपूर्ण शेती प्रयोगामुळे आणि मेहनतीमुळे सरकारकडून त्यांना "वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कारामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यांच्या शेतात विविध प्रयोग करण्याचे त्यांचे स्वप्न आहे आणि त्यांनी तसे ठरवलेसुद्धा आहे.

मोरेश्वर यांच्या प्रेरणादायी यशोगाथा विषयी थोडक्यात

श्री मोरेश्वर सिंगनजुडे यांचा शेतातील हा प्रवास राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांनी देशातील शेतकऱ्यांना दाखवले आहे की शेतात नवीन प्रयोग केले असता शेतातून अधिक नफा मिळवता येतो.

वर्षभर उत्पन्न देणाऱ्या पद्धती शेतात अवलंबल्यास शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा मिळेल. त्यामुळे राज्यातील इतर शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet