Tuesday, 17 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  पद्मश्री शेतकऱ्याची यशोगाथा! सेंद्रिय शेती करून कमी खर्चात, जास्त नफा, काळ्या मिरचीच्या शेतातून शेतकरी झाला लखपती

पद्मश्री शेतकऱ्याची यशोगाथा! सेंद्रिय शेती करून कमी खर्चात, जास्त नफा, काळ्या मिरचीच्या शेतातून शेतकरी झाला लखपती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेंद्रिय शेतीतून नवीन आदर्श निर्माण

मेघालय राज्याच्या पश्चिम गारो हिल्सच्या डोंगराळ रांगेत नानादरो बी. मार्क यांचे गाव वसले आहे. १९८० साली नानादरो बी. मार्क यांना त्यांच्या सासरच्यांकडून ५ हेक्टर जमीन वारसाहक्काने मिळाली. त्यांनी त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या जमिनीवर शेती करायला सुरुवात केली.

त्यांनी शेतात काळी मिरची लावण्याचे ठरवले आणि किरमुंडा जातीच्या काळ्या मिरचीची निवड करून शेतात लागवड केली. त्यांनी या कामासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची गुंतवणूक करून आपल्या शेतात १०० काळ्या मिरचीची झाडे लावली. त्यांनी आधी १०० झाडे लावली, त्यात हळूहळू झाडांची संख्या वाढवत गेले आणि आज त्यांच्या शेतात १०००, १५०० नाही तर तब्बल ३,४०० झाडे आहेत.

त्यांनी अभ्यास करून जमिनीची गरज ओळखली आणि शेतात रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद केला. त्यांच्या या पद्धतीने शेती करण्याच्या पद्धतीने त्यांना २०१९ साली १७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मार्क यांनी हे काम स्वतःसाठी मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्यांनी आतापर्यंत जवळपास १०,००० शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा वापर करून काळ्या मिरचीचे चांगले उत्पन्न कसे मिळवावे याविषयी प्रशिक्षण दिले आहे. मार्क यांच्या शेतातून निघणाऱ्या काळ्या मिरचेला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

काळी मिरीला "काळे सोने" या नावाने सुद्धा संबोधले जाते. जगभरात भारतातील मसाल्यांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. सध्या बाजार भावाचा विचार केला असता, आज बाजारात काळ्या मिरचीचा भाव ६०० रुपये प्रति किलो चालू आहे. मार्क यांनी आपल्या शेतात पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती केली आहे. त्यांनी शेतातील पिकांना नवीन दिशा देण्याचे काम केले आहे.

त्यांच्या शेतातील योगदानामुळे लोकांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिल्याबद्दल केंद्र सरकारने ७२व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नानादरो बी. मार्क यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. याव्यतिरिक्त, २०१८ मध्ये व्हिएतनाम येथे आंतरराष्ट्रीय मिरची परिषद भरवण्यात आली होती; त्यावेळी मार्क यांनी शेती करण्याच्या नवीन पद्धतीसाठी पुरस्कार मिळवला होता.

काळी मिरचीची लागवड कशा पद्धतीने केली जाते?

काळी मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी हवामान अत्यंत पूरक हवे. काळी मिरचीचे पीक जास्त थंड आणि जास्त उष्णतेच्या हवामानात वाढत नाही. भारतात महाराष्ट्र, केरळ आणि मेघालयसारखे राज्ये काळी मिरीचे उत्पादन घेण्यासाठी उत्तम ठिकाणे आहेत. मात्र, देशात याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी काळ्या मिरचीची लागवड केली जाते.

काळी मिरचीच्या लागवडीसाठी 20 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असलेले तापमान सर्वोत्तम मानले जाते. पिकाला १२५ ते २०० सेमी पावसाची आणि आर्द्रतेची गरज असते. त्यासोबत जमिनीची पोत ही pH ५.५ ते pH ६.५ इतकी असावी.

हे पीक भारी जमिनीत आणि पाणी साचणाऱ्या जमिनीत सुद्धा घेतले जाते. या पिकाची लागवड मार्च आणि एप्रिल महिन्यात करणे उत्तम असते. लागवड करताना दोन झाडातील अंतर ८ फूट ठेवावे, जेणेकरून वेलींना वाढण्यासाठी जास्त जागा मिळेल.

वेल जसजसा वाढत जातो, त्यानुसार त्यांना तुम्ही झाडांवर चढण्यासाठी आधार देऊ शकता किंवा शेतातील खांबावर चढण्यासाठी आधार देऊ शकता. तुम्ही वेलींसाठी ज्यापद्धतीने सोय केली असेल, त्या पद्धतीने वेलींना आधार द्या.

काळी मिरचीच्या पिकांना सेंद्रिय खत द्यावे. वेल लागवडी नंतर त्याच्या तिसऱ्या वर्षापासून झाडाला नियमित खत द्यावे लागते. मिरची लागवड केल्यानंतर तुम्हाला ७ ते ८ महिन्यात वेलीवर मिरची काढण्यासाठी तयार होते.

काळी मिरचीच्या झाडांना तयार होण्यासाठी किती दिवस लागतात?

काळ्या मिरचीची रोपे लागवडीनंतर ३ वर्षांनी पूर्णपणे वाढतात. व्यवस्थित नियोजन आणि पिकांची काळजी घेतली तर एक झाड तुम्हाला ३.२ किलो मिरचीचे उत्पादन देते, जे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तिप्पट आहे. मार्क यांनी शेतात मिरची लावताना केलेले योग्य नियोजनामुळे वर्षातून दोनदा काळी मिर्ची काढण्याचे चक्र तयार केले आहे.

नानादरो बी. मार्क यांचा प्रेरणादायी प्रवास

नानादरो बी. मार्क यांनी काही वर्षांपूर्वी कमी खर्चात आणि सेंद्रिय खतांचा वापर करून सुरू केलेली काळी मिरचीची शेती त्यांना लाखो रुपयांचा नफा देणारी शेती ठरली आहे. त्यांनी या प्रयोगातून आर्थिक यशच मिळवले नाही, तर रासायनिक खतांचा वापर बंद करून आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठीसुद्धा त्यांनी योगदान दिले आहे.

आज त्यांच्या शेतातून निघणारी काळी मिरची देशातच नाही तर विदेशातसुद्धा पोहचली आहे. त्यांनी परिसरातील इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. ते शेतकरीसुद्धा आज मार्क यांच्या सारखे यश मिळवत आहेत.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet