उन्हाळ्यात पौष्टिक आहाराचे महत्त्व
उन्हाळ्यात घामावाटे पोषक द्रव्ये ग्रंथींवाटे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी कमी होते जाते, आणि आपल्याला अशक्तपणा आणि थकवा जाणवायला लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी आपल्या जेवणात योग्य आहार घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करायला पाहिजे, जसे थंड पाणी, रसाळ फळे, टरबूज, काकडी आणि ताक यांचा समावेश करायला हवा. त्यासोबतच काही पदार्थ टाळायला हवे, जसे अति मसालेदार पदार्थ, तेलापासून बनवलेले पदार्थ आणि मांसाहारी पदार्थ टाळणे आवश्यक आहे. ते तुमच्या शरीराचे संतुलन ठेवण्यासाठी उत्तम आहे.
उष्णतेची तीव्रता आणि शरीराची काळजी
मार्च महिना संपला आता एप्रिल महिन्याची सुरुवात होईल. आणि त्यासोबत उन्हाचे चटके सुद्धा वाढतील. १२ वाजेनंतर म्हणजे दुपारच्या वेळी काही काम असेल तर घराबाहेर पडणे खूप कठीण झाले आहे. उन्हाचे चटके इतके लागतात की घराबाहेर निघावसे वाटत नाही.
तरीही नोकरी किंवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जावे लागते. अशा वेळी सोबत पाण्याची बाटली किंवा लिंबू सरबत जवळ ठेवत जा. जेणेकरून वेळोवेळी पाणी आणि सरबत पिल्याने शरीराला कमकुवतपणा जाणवणार नाही.
पचनशक्ती आणि आहारविषयी काळजी
उन्हाळ्यात प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती कमी होते. त्यामुळे भूक लागत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात जेवणात हलका आहाराचा समावेश करावा आणि तो २ ते ३ वेळा थोड्या थोड्या प्रमाणात खाण्याचे नियोजन करावे.
एकाच वेळी पोटभरून जेवण करणे टाळावे. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी आणि शरीरातील डिहायड्रेशन होण्यापासून बचाव करण्यासाठी उन्हाळ्यात आपल्या आहारात रसदार फळे आणि पौष्टिक भाज्यांचा समावेश करावा.
उन्हाळ्यातील शरीरासाठी असलेली फायदेशीर फळे आणि पेये
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात हंगामी फळांचे नियमित सेवन शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि ती भरून निघते. त्यासोबत उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून सुद्धा संरक्षण मिळते. म्हणून लिंबू सरबत, लस्सी, उसाचा रस, कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी, आवळा सरबत, ताक यांचे पेये घ्यावीत. त्यासोबत टरबूज, काकडी, खरबूज, डांगर, दही, दूध आणि तूप यांचाही आहारात समावेश करावा.
उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्समुळे होणारे नुकसान
उन्हाळा लागला की बाजारात खूप प्रकारचे शीतपेये (कोल्ड्रिंक्स) विकण्यासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि अनेक लोकांची अशा शीतपेयांची पसंती असते. पण बाजारात मिळणारे कोल्ड्रिंक्स हे शरीराला हानिकारक असतात.
त्यापासून दूर राहणे कधीही उत्तम. तसेच उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवनही कमी करावे, जेणेकरून उन्हाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही.
उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
मसाले हे उष्ण असतात. त्यामुळे उन्हाळ्यात स्वयंपाकघरांत आणि रोजच्या आहारात मसाल्यांचा वापर कमी करावा. त्यासोबत तेलकट पदार्थांचे सेवनसुद्धा टाळावे.
उन्हाळ्यात मांसाहार जेवण्यावर नियंत्रण
मांसाहार अन्न लवकर पचत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात मांसाहार कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. त्यासोबत मसालेदार, तेलकट पदार्थ टाळावेत. जेणेकरून उन्हाळ्यात तुंही तंदुरुस्त राहाल.
उन्हाळ्यात शरीरासाठी उपयुक्त पदार्थ
फळे: उन्हाळ्यात काकडी, खरबूज, मोसंबी, कलिंगड, द्राक्षे, संत्री, अननस, पपई यांचे सेवन करायला हवे. जेणेकरून हे फळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतील आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतील.
पाणी: दिवसभरात माणसांनी ३.७ लिटर पाणी प्यावे म्हणजे १२-१५ ग्लास पाणी. महिलांनी २.७ लिटर पाणी प्यावे म्हणजे ९-१२ ग्लास पाणी. ४ ते १३ वयोगटातील मुलांनी १.५-२.५ लिटर पाणी प्यावे म्हणजे ६-१० ग्लास पाणी. वयस्कर वृद्धांनी २-२.५ लिटर पाणी प्यावे म्हणजे ८-१० ग्लास पाणी. घरात माठ असेल तर त्यामधील थंड पाणी पिणे उत्तम, फ्रिजमधील थंड पाणी पिणे टाळावे.
भाज्या: जेवणात पौष्टिक काकडी, गाजर, कोशिंबीर, पालेभाज्या, बीट आणि कांद्याचे सेवन आपली रोजच्या आहारात ठेवावे.
निष्कर्ष
उन्हाळ्यात शरीराचे संतुलन उत्तम राखण्यासाठी पुरेसे पाणी प्या. पाणी पिण्यास कंटाळा करू नका, जेवणात हलका आहार घ्या,मांसाहार, अन्न आणि तेलंगट पदार्थ टाळा, आणि ताजे रसदार फळांचे रोज सेवन करा. जर तुम्ही तज्ज्ञांचा हा सल्ला योग्य रित्या पाळला, तर नक्की तुम्ही उन्हाळ्यातही निरोगी राहू शकता.
👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping Click here