अन्न पचन समस्या निर्माण होऊ शकतात
तज्ज्ञ सांगतात की जर खरबूज आणि टरबूज एकत्र खाल्ले तर शरीरातील पचनसंस्थेवर त्याचा ताण पडू शकतो. ज्यामुळे तुम्हाला अपचन, गॅस आणि सूजन सारख्या समस्या उद्भवू शकतात. या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरातील अन्न पचनावर परिणाम करू शकते.आपल्या शरीरातील अन्न पचन प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी ही फळे वेगवेगळी खाणे सर्वात उत्तम आहे.
अन्न विषबाधेचा धोका (Increased Risk of Food Poisoning)
बाजारात खरबूज आणि टरबूजाची मागणी वाढली की त्यात भेसड करण्यास सुरुवात होते. मग त्यांचा रंग बदलण्यासाठी आणि चवीमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी खूप विषारी रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात येतो, जे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असतात. अशी फळे खाण्यात आल्याने आपल्याला फूड पॉयझनिंग, अॅलर्जी आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी फळे घेताना ताजी आणि सेंद्रिय फळे विकत घेणे फायदेशीर आहे.
त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात (Skin Related Problems)
टरबूज आणि खरबूज पिकवण्यासाठी रासायनिक रंगांचा वापर केला गेला असेल तर याचा वाईट परिणाम त्वचेवर होऊ शकतो. पुरळ, मुरुम आणि त्वचेच्या संदर्भातील वेगवेगळ्या अॅलर्जीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारचे भेसड केलेलेरसायन खाण्यात आले की आपल्या त्वचेची नैसर्गिक चमक खराब करतात. तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी ताज्या फळांची, सेंद्रिय फळांची निवड करा आणि कुत्रिम रंगांचा वापर केलेली फळे ओळखून त्या पासून लांब राहा.
पित्त दोष वाढणे (Increased Risk of Pitta Dosha)
तुमच्या कडून खरबूज आणि टरबूज एकत्र खाल्ले गेले तर तुम्हाला पित्ताशी निगडित त्रास होऊ शकतो. ज्यामुळे अॅसिडिटी, पोटात जळजळ सारख्या समस्या उद्भवू शकतात. दोन्ही फळे थंड, गोड स्वभावाची असली तरी सोबत खाल्याने याचा पचनावर परिणाम होतो. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दोन्ही फळे वेगळी खाणे चांगले.
शरीरात संसर्गाचा धोका वाढू शकतो
आपण मुंबईसारख्या शहरात पाहतो. गटारीच्या पाण्यापासून भाजीपाला, खरबूज आणि टरबूजसारखी फळे घेतली जातात. त्यासोबत नदी, नाल्याच्या शेजारीही फळे घेतली जातात. या दूषित पाण्यात उगवलेली फळे खाण्यात आल्याने या मधील जिवाणू शरीरातील पचनसंस्थेत संसर्ग निर्माण करू शकतात. जुलाब आणि उलट्या यांसारख्या समस्या सुद्धा निर्माण होऊ शकतात. त्यामुळे फळांची निवड योग्य करा. खाण्याच्या अगोदर स्वच्छ धून घ्या. जेणेकरून तुम्हाला अशा संसर्गजनक आजार होणर नाही.
Disclaimer
हा लेख फक्त सामान्य सल्ल्यासाठी लिहिली आहे. तुम्हाला या विषयी अधिक माहिती हवी असेल तर नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. krushimarathi.in या माहितीची जबाबदारी घेत नाही.