Friday, 20 June 2025
My Village   English   हिंदी
Home  |  New UPI Rule: 1 एप्रिलपासून मोठे बदल! मोबाईल क्रमांक बंद झाला असेल तर तुमचे UPI व्यवहार बंद होतील

New UPI Rule: 1 एप्रिलपासून मोठे बदल! मोबाईल क्रमांक बंद झाला असेल तर तुमचे UPI व्यवहार बंद होतील

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NPCI ने केलेले नवीन बदल?

अनेकदा आपण आपल्या मोबाईल नंबरच्या सेवा बंद करतो. किंवा काही कारणास्तव आपण क्रमांक बदलतो. पण तुमचा बंद झालेला नंबर सर्व ठिकाणांहून बदलणे तितकेच महत्वाचे आहे. कारण काही दिवसांनी तुम्ही तुमचा क्रमांक सक्रिय केला नाही तर टेलिकॉम कंपन्या तो नंबर नवीन ग्राहकाला देतात.

आपल्या मोबाईल क्रमांकाने सुद्धा UPI ID तयार झालेला असतो. असा बंद क्रमांक सर्व महत्वाच्या जागेवरून म्हणजे बँक खाते, मोबाईल अँप्स, आणि इतर ठिकाणांहून काढणे महत्त्वाचे आहे. तुमचा क्रमांक दुसऱ्या व्यक्तीला दिला असल्यास फसवणुकीचा धोका पण वाढतो. म्हणून NPCI ने देशातील बँकांना आणि देशात UPI अॅप्स चालवणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

प्रत्येक आठवड्याला निष्क्रिय मोबाईल नंबर तपासून त्यांना लगेच तुमच्या सिस्टममधून काढून टाकणे. जर कोणत्याही व्यक्तीचा नंबर बंद असेल आणि त्यांना तोच नंबर चालू करायचा असेल, तर कंपन्या आधी अलर्ट मेसेज पाठवतील. मेसेज नंतर सुद्धा तुम्ही मोबाईल नंबर चालू केला नाही तर तो UPI सिस्टममधून डिलिंक करण्यात येईल आणि तुमचे UPI व्यवहार बंद करण्यात येतील.

NPCI लवकरच पुल ट्रान्झॅक्शनवरही बंदी घालू शकते?

“पुल ट्रान्झॅक्शन” म्हणजे सोप्या भाषेत सांगणे झाले म्हणजे. एखाद्या व्यक्तीला तुमच्या कडून ऑनलाईन पैसे घ्यायचे असतील तर ते तुम्हाला तुमच्या UPI अॅपवर पेमेंट करण्यासाठी एक विनंती पाठवतात. तुम्हाला फक्त आलेल्या विनंतीला उघडून तुम्हाला UPI पिन विचारला जाईल.

तुम्ही तुमचा पिन टाकला की लगेच पेमेंट होईल. पण हल्ली कोणीही या सुविधेचा गैरफायदा घेऊन देशातील लोकांना फसवण्याचे काम करत आहेत. अशा भरपूर तक्रारी पोलिसांकडे आणि सरकारकडे करण्यात आल्या आहेत, म्हणून NPCI “पुल ट्रान्झॅक्शन” हे फीचर बंद करू शकते. याबाबत सरकारकडून अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. भविष्यात लवकरच या विषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल.

सरकारचे डिजिटल पेमेंटविषयीचे उद्दिष्ट

भारत सरकारने देशांतर्गत २०२५-२६ पर्यंत २०,००० कोटी रुपयांचे UPI व्यवहार देशात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन सुद्धा देत आहे. सरकारचे भारतातील ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये विशेष करून डिजिटल पेमेंटचा प्रसार करण्यावर भर असणार आहे.

या आधी RuPay Debit Card आणि Bhim UPI व्यवहारावर लावण्यात येणारे व्यापारी शुल्क शून्य केले गेले आहेत, ज्यामुळे देशातील दुकानदारांना UPI पेमेंट स्वीकारणे सोपे झाले आहे.

UPI चे महत्व

NPCI ने देशात UPI पेमेंट प्रणालीची सुरुवात केली. व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) बनवून त्याला तुमच्या बँक खात्याशी जोडावे लागते. VPA जोडल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक किंवा UPI आयडीचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता.

यात तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोडची गरज लागत नाही. यामुळे कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट, ईकॉमर्स पोर्टलवरून ऑनलाइन खरेदी किंवा रोजच्या दैनंदिन व्यवहारांसाठी UPI खूपच महत्वाचा ठरतो.

तुमचे UPI व्यवहार सुरळीत चालण्यासाठी तुम्ही काय करावे?

१ एप्रिलपासून देशात NPCI कडून लावल्या जाणाऱ्या नवीन नियमांमुळे UPI व्यवहार करणे अधिक सुरक्षित होणार आहे. पण त्यासाठी आधी तुमचा मोबाईल क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे. जर भविष्यात तुम्हाला जुन्या क्रमांकाने UPI वापर करायचा असेल तर UPI आणि बँकेत जोडलेला नंबर बंद आहे की नाही, तपासा.

जर नंबर बंद असेल तर बँकेत जाऊन नवीन नंबर अपडेट करून घ्या आणि बँक खात्यासोबत नवीन नंबर लिंक करून घ्या. नंबर लिंक करण्यासाठी ज्या बँकेत तुमचे खाते असेल तिथे जाऊन "मोबाईल नंबर अपडेट" साठी फॉर्म भरून द्या. तुमचा नंबर लगेच बदलण्यात येईल. कारण असेल केले नाही तर १ एप्रिलपासून डिजिटल पेमेंट करताना तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

👉 To see amazing offers from 'Smart Deals' for shopping  Click here

Leave a Comment


No comments yet