नेटवर्कच्या समस्येमुळे होणारे नुकसान
तुमच्या जवळ कितीही महाग स्मार्टफोन असला, तरी नेटवर्कशिवाय तुमच्या जवळ असलेला मोबाईल हा फक्त मर्यादित उपयोगासाठी राहतो. नेटवर्क कमी झाल्यामुळे खूप गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. सर्वात पहिले इंटरनेट स्पीडवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो.
तुम्ही ऑनलाईन काही काम करत असाल तर त्यात खूप अडथळे येतील, जसे की वेबसाइट लोड होणार नाही, व्हिडिओ चालणार नाही, फक्त बफर होईल, आणि तुम्हाला काही डाउनलोड करायचे असेल तर ते सुद्धा होणार नाही.
दुसरा परिणाम हा कॉलिंगवर होईल. कॉल चालू असताना स्पष्ट आवाज येणार नाही किंवा कॉल बंद होईल.
तिसरा परिणाम म्हणजे ऑनलाइन होणारी सर्व कामे बंद होतील, जसे की ऑनलाइन पेमेंट, कॅब बुकिंग, आणि फूड ऑर्डर यासारख्या ऑनलाईन सुविधांचा वापर करता येणार नाही.
चौथी समस्या म्हणजे तुम्ही तुमच्या रोजच्या कामांचे, जसे की तुमच्या ऑफिसचे ईमेल तपासणे, व्हिडिओ कॉलिंग करणे, किंवा सोशल मीडियाचा वापर करणे कठीण होईल. या समस्या टाळण्यासाठी खाली काही सोप्या टिप्स आहेत, ज्यामुळे तुम्ही फोनचे नेटवर्क पुन्हा आणू शकता.
तुमचा फोन पुन्हा रीस्टार्ट
नेटवर्क समस्येवर सर्वात सोपा आणि सरळ उपाय म्हणजे फोनला रीस्टार्ट करणे. सततच्या मोबाइलच्या वापरामुळे त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे त्याचा परिणाम हा नेटवर्कवर होतो म्हणजे नेटवर्क फ्लक्च्युएट होते.
तुम्ही फोन एकदा किंवा दोनदा रीस्टार्ट केल्याने ही त्रुटी दूर होऊ शकते. रीस्टार्ट करण्याचा फायदा असा आहे की फोन नवीन नेटवर्क शोधतो आणि आपल्या फोनचे कनेक्शन स्थिर होते.
फोनचा एअरप्लेन मोड ऑन-ऑफ करा
तुमच्या जवळ फोन रीस्टार्ट करण्याचा वेळ नसेल, तर तुम्ही मोबाईलमधील एअरप्लेन मोडचा वापर करू शकता. एअरप्लेन मोड हा तात्पुरते फोनचे सर्व नेटवर्क कनेक्शन बंद करतो. त्यानंतर पुन्हा बटणावर क्लिक करा. असे केल्याने फोन पुन्हा नव्याने कनेक्ट होतो. असे केल्याने नेटवर्क रिफ्रेश होते आणि तुम्हाला येणाऱ्या सिग्नलच्या समस्या दूर होऊ शकतात.
नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा
जर तुम्ही वरचे दोघी पर्याय वापरले असणार आणि त्या पासून समस्या दूर झाली नसेल, तर पुढे तुम्ही फोनमधील नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा. असे केल्याने आपल्या फोनच्या नेटवर्कशी संबंधित सर्व सेटिंग्ज पुन्हा पूर्ववत येतात आणि असे केल्याने तुमच्या नेटवर्कची समस्या सुटू शकते.
सिम कार्ड काढा आणि पुन्हा लावा
काहीवेळा असे होते की फोनमधील सिम कार्ड व्यवस्थित कार्य करत नाही, म्हणजे कनेक्ट होत नाही. किंवा त्या स्लॉटमध्ये धूळ साचते, अशामुळे सुद्धा नेटवर्कची समस्या निर्माण होते. अशा वेळी मोबाईलमधील सिम कार्ड काढून पुन्हा लावणे आवश्यक आहे. यामुळे सुद्धा फोन नवीन नेटवर्कचा शोध घेऊन कनेक्ट होतो आणि आपली समस्या दूर होते. हा सुद्धा प्रभावी उपाय आहे.